६ मे कसाबसाठी घातवार...

Tuesday, 5 May 2009


६ मे कसाबसाठी घातवार ठरणार आहे....कारण ६ मे म्हणजे बुधवारी कसाब आणि त्याच्या साथादारांविरुद्ध आरोप निश्चित करण्यात येणार आहे. ४ मे रोजी विशेष कोर्टाचे न्यायाधीश एम.एल तहिलयानी यांनी एक दिवसानंतर म्हणजेच ६ मे रोजी आरोप निश्चित करणार असल्याचं स्पष्ट केलं. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी ३५ फरार आरोपींविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढावं अशी मागणी केली. निकम यांनी कोर्टाला आणखी एक विनंती केली. कसाबचा कबुलीजबाब, दहशतवाद्यांमध्ये सॅटेलाईट फोनद्वारे झालेल्या संभाषणाचा मसूदा ही आणि अशी अन्य कागदपत्र आपल्याला दिली जावीत अशी मागणी निकम यांनी केली. ही कागदपत्र पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आलेल्या ६ दहशतवाद्यांविरुद्ध पुरावा म्हणून वापरली जाणार आहेत. दरम्यान फहिम अन्सारीचे वकील शाहिद आझमी यांनी प्रस्तावित आरोपावर युक्तीवाद करताना कश्मीर हा भारताचा भागच नसल्याचं सांगितलं. याला आधार म्हणून त्यांनी भारतीय दंडविधान च्या कलम १८ चा दाखला दिला. ज्यात भारत म्हणजे जम्मू कश्मीर वगळता इतर प्रदेश अशा स्वरूपाची व्याख्या केलेली आहे. कसाबने दिलेल्या कबुलीजबाबात कश्मीर स्वतंत्र करण्यासाठी भारतावर हल्ला करायचा होता अशी माहिती दिलीव होती. हाच धागा पकडत आझमी यांनी जम्मू कश्मीर जर भारताचा भागच नाहीये तर मग फहिमवर देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोपच लागू शकत नाही असा युक्तीवाद कोर्टात केला.

0 comments:

About This Blog

Lorem Ipsum

  © Free Blogger Templates Nightingale by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP