७ लोकांच्या खुन्याला आरोप मंजूर नाही...

Thursday, 7 May 2009

सात लोकांची हत्या करणा-या आणि साथीदारासह ७२ वोकांना मारणा-या कसाबविरुद्ध कोर्टाने ८६ आरोप निश्चित केलेत. कसाब, फहिम आणि सबाउद्दीन यांच्याविरुद्ध भारताविरुद्ध युद्ध पुकारून १६६ जणांची हत्या केल्याचा आरोप विशेष सत्र न्यायालयाने निश्‍चित केला. या तिघांव्यतिरिक्त पाकिस्तानातील ३५ फरार आरोपी (यातील सहा आरोपी पाकिस्तामध्ये अटकेत आहेत) यांच्यासह ठार करण्यात आलेले ९ दहशतवादी अशा एकूण ४७ जणांविरूद्ध आरोपनिश्चिती करण्यात आली आहे. कसाबला कोर्टाचे कामकाज समजावं म्हणून न्यायाधीक्ष तहिलयानी यांनी मुद्दाम ऊर्दूमिश्रीत हिंदी शब्दांचा वापर केला. कसाब, फहिम आणि सबाउद्दीन विरूद्ध भारतात आणि भारताबाहेर कटकारस्थान करून भारताविरुद्ध युद्ध पुकारणे, त्यासाठी प्रशिक्षण घेणे आणि अतिरेकी कारवाया करणे, असे आरोप ठेवण्यात आलेत. याशिवाय कसाबवर २४ स्वतंत्र आरोप निश्चित करण्यात आलेत. यात छ.शि.ट स्थानकात गोळीबार, कुबेर जहाजावरील तांडेलची हत्या, कामा रुग्णालय, कामा रुग्णालय परिसर, गिरगाव चौपाटी चौपाटीवर लोकांची हत्या करणे आणि , माझगांवमध्ये टॅक्‍सीत घडविलेला बॉम्बस्फोट अशा आरोपांमध्ये कसाबने प्रत्यक्ष सहभाग घेतल्याचं कोर्टाने मान्य केलंय. फहीमवरही स्वतंत्रपणे दोन आरोप ठेवण्यात आलेत. बोगस नाव घेऊन संगणक केंद्रात प्रवेश घेणे आणि रिलायन्स मोबाईलचे सिम कार्ड बनावट नावाने घेतल्याच्या आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलाय. कसाबला आरोपांबाबत जेव्हा कोर्टाने विचारलं तेव्हा त्याने मठ्ठ चेह-याने मला आरोप मान्य नाहीत म्हणून सांगितलं. त्याचाच पदर धरत फहिम आणि सबाउद्दीनही आरोप मान्य नाही म्हणून पिपाणी वाजवायला सुरवात केली.

0 comments:

About This Blog

Lorem Ipsum

  © Free Blogger Templates Nightingale by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP